'काय केले याने, लिहिले आहे गाणे'
गेली अनेक वर्षं हे गाणं
आम्हा सर्व मित्रांच्या मनाचा कवडसा जपतंय.
वाचणा-या प्रत्येकापाशी ही कविता पोहचावी अशी खूप वर्षांपासूनची इच्छा होती.
नागराजच्या अोंजळीतून खूप प्रेमानी हा संग्रह सगळ्यांसमोर येतो आहे यापरता आनंद नाही.
येत्या शनिवारी २७ तारखेला संग्रामचा पहिला कवितासंग्रह 'रिकामटेकड्याचे आत्मवृत्त' सांगलीत विष्णूदास भावे नाट्यगृह येथे प्रकाशित होतो आहे.
मित्रांनो, सगळे नक्की या.